आजकाल च्यां धकाधकीच्या आयुष्यात आज कोणता दिवस आणि कोणता वार आहे हे सुध्दा लोक पटकन सांगू शकत नाहीत ,
त्यात चातुर्मास कधी सुरू होतो असा जर प्रश्न कोणी विचारला तर ?
सर्वात प्रथम चातुर्मास म्हणजे काय हेच काहीना माहीत नसते ,
चातुर्मास म्हणजे आषाढी एकदशी ते कार्तिकी एकादशी असा चार महिन्याचा काळ होय . आषाढ महिन्यात जी शयनी एकादशी आहे म्हणजेच आषाढी एकादशी ज्या दिवशी पंढरपूर ची यात्रा असते ,याa दिवसापासून चातुर्मास सुरू होतो ,म्हणजेच या वर्षी चातुर्मासाची सुरुवात ही दिनांक १७ /०७/२०२४ पासून सुरू झाला व याची समाप्ती ही १३ /११/२०२४ ला बुधवारी आहे . प्रबोधनी एकादशीला चातुर्मास संपतो असे म्हणतात .
यंदा प्रबोधनी एकादशी ही दिनांक १२/११/२०२४ ला आहे.

